सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - दिल्ली अभी दूर है, मी राज्यात सरकार आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत परळ येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या सभेत फडणवीस यांनी राज्यात भाजपचे सरकार आणण्याचा निर्धार केला. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला.

फडणवीस म्हणाले, ‘‘मी मैदान सोडून पळणाऱ्यांपैकी नाही. मी महाराष्ट्र सोडणार नाही, असे सांगत दिल्लीत जाणार नाही, हे स्पष्ट केले. आमचे सरकार पुन्हा आणणारच, असा निर्धार फडणवीस यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रात सरकार येत नाही, तोपर्यंत जाणार नाही. सध्याचे सरकार हे राजकीय हाराकिरी करून आलेले सरकार आहे. आपले सरकार बहुमताने आलेले होते. उद्या भविष्यात मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.’’ 

तीनचाकी रिक्षाप्रमाणे हे सरकार आहे. रिक्षाची चाके एकाच दिशेने जातात; मात्र याची चाके तिन्ही बाजूला विरुद्ध दिशेने जात आहेत. हे फार काळ टिकणारे सरकार नाही. आम्ही कोणाचा विश्‍वासघात केलेला नाही. उलट आताचे ठाकरे सरकार हे विश्‍वासघातकी सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. आताच्या सरकारने एकच चांगले काम केले, ते म्हणजे आम्ही जे चांगले निर्णय घेतले होते आणि विकासकामांसाठी गती वाढवली होती, ते त्यांनी थांबवण्याचे काम केले. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. त्यामुळे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. तशा तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com