
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.