
मुंबई - लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळूहळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत असून, गेल्या दोन दिवसांत रेल्वेद्वारे सुमारे दीड लाख मजूर राज्यात दाखल झाले आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परत गेले होते. ते आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडेपंधरा हजार कामगार येत आहेत. गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते साडेअकरा हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या ही संख्या कमी आहे; उद्योगधंदे, व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत वाढ होईल.
महाराष्ट्रातून परराज्यांत गेलेले मजूर
८२२ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ११ लाख ८६ हजार २१२
एसटी बसने
एकूण बस : ४४,१०६
एकूण मजूर : ५,३७,५९३
पायी : अंदाजे ३ लाख
दोन दिवसांत सध्या रेल्वेने महाराष्ट्रात आलेले मजूर - १.५० लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.