Dharmendra Birthday: गाडी सुटणार तितक्यात मनोज कुमार आले आणि धर्मेंद्र यांचं नशीब पालटलं..

एकेकाळी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी झगडणारे धर्मेंद्र आज एक दिग्गज अभिनेते आहेत.
Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days
Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling dayssakal

Dharmendra Birthday Special: बॉलीवुडमधील दिग्गज नट म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांचा वाढदिवस. त्यांचे कित्येक चित्रपट आजही आपल्या लक्षात आहेत. 'शोले' तर कायमस्वरूपी सगळ्यांच्या मनावर कोरला गेला आहे. एकेकाळी 'अॅक्शन हीरो' म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र आज वृद्धापकाळातही अत्यंत आनंदात आणि उत्साहात जगत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून ते 88 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज त्यांनी एवढं यश मिळवलेलं असलं तरी एक काळ असा होता की, काम मिळत नसल्याने धर्मेंद्र मुंबईतील गाशा गुंडाळून गावी निघाले होते. आज जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं तेव्हा.. (Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days)

Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days
Jhimma 2: "एखादा भाग फसेल! ठिक आहे पण...", झिम्मा २ पाहून हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल (Dharam Singh Deol) असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत. बॉलीवुडमध्ये धर्मेंद्र 'अॅक्शन हीरो' म्हणून ओळखले जात असतानाच अनेक रोमॅंटिक सिनेमे त्यांच्या वाट्याला आले त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने ते हिट देखील केले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्यापुढे चित्रपटांचा अक्षरशः ढीग लागायचा, पण त्यांच्या करियरची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली आहे.

Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days
Bigg Boss Marathi 4: ते थुकतील तुझ्या तोंडावर.. अमृताने सोडली पातळी.. प्रसादचा राग अनावर

धर्मेंद्र पंजाबमधून आल्यानंतर मुंबईत नशीब आजमावत होते, तेव्हा त्यांची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. दोघेही एकाच मार्गावर होते त्यामुळे मैत्रीही झाली. मनोज कुमार यांना लेखनाची कामे मिळत असल्याने त्यांचे उत्तम चालले होते पण धर्मेंद्र यांना मात्र कोणतेच काम मिळत नव्हते. ज्या चित्रपटासाठी ते पंजाबहून मुंबईला आहे तो हे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रचंड तणावात होते.

धर्मेंद्र यांना सिनेसृष्टीत यश मिळत नसल्याने त्यांनी मुंबई सोडून पुन्हा पंजाबला आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ट्रेनदेखील पकडली होती. पण धर्मेंद्र परत जात असल्याचे मनोज कुमार यांना समजले आणि त्यांनी लगेचच स्टेशन गाठलं. धर्मेंद्र यांना भेटून समजावलं आणि घरी परत आणलं. तोच धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील मोठा दिवस ठरला.

Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days
Junior Mehmood: "मी जग सोडून गेल्यावर..", ज्युनियर मेहमूद यांची शेवटची इच्छा ऐकुन डोळे पाणावतील

धर्मेंद्र यांनी 1960 साली अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना 51 रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजवर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com