Jitendra Joshi: अनेक पुरस्कारांनी गौरविलेला 'गोदावरी' सिनेमा नुकताच रिलीज झालेला आहे. या सिनेमामुळे सध्या अभिनेता जितेंद्र जोशीची देखील चर्चा होताना दिसतेय. जितेंद्रनं गोदावरी सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सध्या जितेंद्र जोशीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची चर्चा आहे. या व्हिडीओत जितेंद्रनं नात्यांवर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे. या व्हिडीओत त्यानं जे काही सांगितलंय ते व्हिडीओ पूर्ण पाहिल्यावर १०० टक्के खरं आहे हे आपण देखील म्हणाल.
सोशल मीडियावर जितेंद्र जोशीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं आपलं पहिलं नातं निसर्गाशी आहे हे सांगताना मार्मिक विचार शेअर केले आहेत. तो म्हणाला आहे,'माणसांनी ठरवलंय हे म्हणजे असं नातं,या नात्याचं असं होतं,त्या नात्याचं तसं व्हायला पाहिजे,पण या नात्याच्या पलिकडेही काही गोष्टी आहेत आणि त्या बघता आल्या पाहिजेत''.
''माणसाचं सर्वप्रथम नातं कोणाशी, तर निसर्गाशी आहे. कारण माणूस रोज ऑक्सिजन घेतो,पाणी पितो,माणूस उत्सर्जन करतो. ही जी पंचमहाभूतं आहेत. रोज पृथ्वीचा आपल्या पायाला स्पर्श होतो, आपण जमिनीवर बसतो. आकाश,पृथ्वी,जल,वायू या सगळ्या तत्वांचा समावेश आपल्या शरीरात आहे. म्हणूनच आपलं पहिलं नातं असेल तर ते निसर्गाशी आहे. वसुधेव कुटुंबकम्...असं म्हणणारी संस्कृती आहे आपली. वसुधेव म्हणजे ही जी पृथ्वी आहे आपली, ही एक कुटुंब आहे...''.
जितेंद्र जोशीच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकानं लिहिलंय, 'हे खरंय, आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय हे आपलं दुर्दैवं'. तर आणखी एकानं लिहिलंय,'तू नेहमीच भारी बोलतोस जितू...'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.