मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिक नोंदणी या दोन मुद्दय़ांवर देशभर तीव्र आंदोलन सुरु असताना मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले की, राजकारणाचं भजं झालं आहे. एका मराठी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मकरंद अनासपुरे म्हणाले, 'जेव्हा शासनव्यवस्था कुठलाही निर्णय घेते, तेव्हा त्यावर पूर्ण अभ्यास करून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. बऱ्याचदा शासन व्यवस्थेविरुद्ध व्यवस्थापन कार्यरत असते, त्यांना त्यांचं काहीतरी साधून घ्यायचं असतं. अनेकांच्या प्रतिक्रियांवरून कळतच नाही की हे नेमकं काय आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की, राजकारणाचं भजं झालंय.'
काँग्रेससोबत गेल्याने मानसिकता बदलली का?- हरिभाऊ बागडे
खंत वाटावी अशी ही परिस्थिती आहे. एखाद्यावर विश्वास ठेवावा अशी सध्याची परिस्थिती नाही. पूर्वीचे नेते ज्या ताकदीने, ज्या निष्ठेने उभे राहिले होते त्याचं शेवटपर्यंत त्यांनी पालन केलं होतं. अलीकडच्या काळात असं खूप कमी दिसायला लागलं आहे, असेही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.