अभिनेत्री सोनाली कुलकर्णी स्पष्ट आणि सडेतोड विधानांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय मुली आळशी आहे, त्यांना चांगला कमावणारा नवरा हवा असतो, अशा आशयाच्या तिच्या विधानाचा आता मॉडेल उर्फी जावेदने समाचार घेतला आहे.
राजकारणी असो, तिच्यावर टीका करणारे नेटकरी असो, किंवा माध्यमं... कोणालाही न घाबरता उर्फी जावेद सतत आपली मतं मांडत असते. सोनाली कुलकर्णीच्या या विधानाबद्दलही उर्फीने ट्वीट करत आपला आक्षेप नोंदवला आहे.
आपल्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, "तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील आहे. आधुनिक काळातल्या महिला जेव्हा त्यांचं काम आणि घरातली कामं एकत्र सांभाळत असतात, तेव्हा तुम्ही त्यांना आळशी म्हणता? चांगला कमावणारा नवरा हवा यात गैर काय आहे?
उर्फी पुढे म्हणते, "वर्षानुवर्षे पुरुषांनी महिलांकडे केवळ मुलं जन्माला घालण्याची मशीन म्हणूनच पाहिलं आहे. आणि लग्नाचं मुख्य कारण म्हणजे हुंडा. त्यामुळे महिलांनो, बोलण्यासाठी किंवा काही मागण्यासाठी घाबरू नका. महिलांनी काम करायला हवं हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हा एक विशेषाधिकार आहे, जो प्रत्येकाला मिळत नाही."
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.