काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अली अब्बास जफरने मिस्टर इंडिया सिनेमाच्या रिमेकची घोषणा केली होती. त्यानंतर अली बराच चर्चेत राहिला.. यावर दिग्दर्शक शेखर कपूरने अलीला धारेवर धरल्यानंतर आता अभिनेत्री सोनम कपूरने देखील दिग्दर्शकावर निशाणा साधलाय.. खर तर सोनम या गोष्टीमुळे नाराज आहे की दिग्दर्शक अली अब्बास जफरने मिस्टर इंडियाच्या रिमेकसाठी सोनमचे वडिल अनिल कपूर यांनाच याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.. सोशल मिडियावर याबाबत सोनमने आपलं स्पष्ट मत मांडलंय...
सोशल मिडियावर सोनमने लिहीलंय की, 'मला खूपजण मिस्टर इंडियाच्या
रिमेकबाबत विचारत आहेत..माझ्या वडिलांना तर अशा कोणत्या रिमेकबाबत माहित देखील नाही..आम्हा सगळ्यांना हे तेव्हा कळालं जेव्हा या सिनेमाच्या
रिमेकबाबत अली अब्बास जफर यांनी ट्वीट केलं..यापुढे जाऊन सोनम सांगते, ही खरंच दुर्देवाची गोष्ट आहे की माझे वडिल अनिल किंवा काका शेखर
यांच्यासोबत याबाबत कोणी चर्चा देखील केली नाही..या दोघांचाही हा सिनेमा
बनवण्यात मोठा वाटा होता..ही खरंच खेदजनक बाब म्हणावी लागेल कारण मिस्टर इंडिया हा सिनेमा माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळचा सिनेमा आहे आणि या सिनेमासाठी त्यांनी खूप मेहनत देखील घेतलीये..'
महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच काही दिवसांपूर्वी सोनमच्या आधी मिस्टर
इंडियाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी देखील याबाबत आपली खंत व्यक्त केली होती.. शेखर यांनी ट्वीट करत असं लिहिलं होतं की, 'मिस्टर इंडिया २ बाबत कोणाकडूनही मला विचारणा झालेली नाही..मला असं वाटतं की सिनेमासाठी मोठा विकेंड बनवण्याच्या तयारीत या सिनेमाच्या नावाचा वापर केला जात आहे. मात्र कोणालाही सिनेमातील पात्र किंवा सिनेमाच्या कथेचा वापर खऱ्या निर्मात्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.