- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

वैशालीच्या आई वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते.

करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील २० वर्षीय अविवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास लावून बुधवारी (ता.24) आत्महत्या केली आहे. वैशाली राधाकिसन जाधव असे या तरुणीचे नाव असून तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली आहे. त्यानुसार वैशालीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची. त्यात त्यांनी वैशालीच्या अगोदर चार मुलींचे लग्न केलेले आहे.
वैशालीच्या आई वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली असल्याने या नैराश्यातुने तिने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे. असे त्या चिठ्ठीत लिहिलेले आहे. शिवाय तिने कुणालाही या आत्महत्येस जबाबदार धरलेले नाही. वैशालीच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. करमाड येथील पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील पुढील तपास करित आहेत.
वाचा - संजना जाधव देणार माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना टक्कर? सरपंच, उपसरपंचांच्या सत्काराला लावली हजेरी
संपादन - गणेश पिटेकर
