औरंगाबाद शहरामध्ये लॉकडाऊनचे आदेश मोडणाऱ्या ४४ जणांवर गुन्हे 

File Photo
File Photo

औरंगाबाद - शहरामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी शिवाय घराबाहेर निघू नये असे प्रशासनाने आवाहन केले.

तरीही लॉकडाऊनचे आदेश मोडणाऱ्या ४४ जणावर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 
विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शहरांमध्ये विनाकारण फिरणारे तसेच मज्जाव असतानाही दुकान उघडणारे आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यात विनाकारण फिरणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, दोन दुकानदाराचा ही यात समावेश आहे. एका तंबाखू जन्य पदार्थ विक्री त्यावरही कारवाई झालेली आहे. त्यांच्यावर कडक कार्यवाही ही करण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत जमावबंदीच्या काळात १४४ लोकांवर लॉकडाऊन, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केले म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सोमवारपासून (ता. ३०) आणखीन कडक स्वरूपाची कारवाई केली जात आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विनाकारण रस्त्यावर फिरू नये. आपापल्या घरातच सुरक्षित राहावे अन्यथा कायद्यायचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com