औरंगाबाद - जगात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. भारतातही रोज बाधितांची संख्या वाढत आहे. असे असले तरी योग्य उपचाराने काही जण बरेही झाले आहेत. ही जगासाठी दिलासादायक बातमी आहे. बरे होणारांची संख्या लाखावर गेली आहे. त्यावर eSakal.com ने टाकलेला प्रकाश.
जगात आजपर्यंत (ता. २७ मार्च) एकूण ५ लाख ३७ हजार ११३ जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन कोवीड-१९ ची बाधा झाली. त्यापैकी १ लाख २४ हजार ४३९ रुग्ण बरे झाले; तर २४ हजार १२६ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली.
अमेरिकेमध्ये २७ मार्चपर्यंत ८५ हजार ६१२ जणांना कोवीड-१९ ची लागण झाली तर चीनमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, ८१ हजार ३४० जण बाधित आहे. चीनमध्ये आज (ता. २७ मार्च) ५५ नवे रुग्ण आढळले; तर अमेरिकेत हीच संख्या १७७ आहे.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या देशात ७५३ जण कोवीड-१९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी ६७ जण बरे झाले तर १८ जणांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण केरळ आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आहेत. कालच्या तुलनेत देशभरात आज १८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातील १३५ रुग्णांपैकी १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (ता. २७ मार्च) राज्यात नवे राज्य रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.