औरंगाबाद ग्रामीणमधुन एक लाखाहून अधिक ई-पासचे वाटप 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयासोबत अन्य व्यक्तींना आपल्या गावी जाता यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने एक लाख सहा हजार ३३ जणांना ई-पास दिल्या. एक हजार ५५४ अर्ज प्रलंबित असून मंजूर; पण वैधता संपलेल्या अर्जाची संख्या एक लाख तीन हजार ९५७ एवढी आहे. यामुळे अनेकांना आपल्या गावी जाता आले. दरम्यान, प्रशासनाने २३ हजार ३४३ अर्ज नाकारले. 

लॉकडाउनमुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात लोक अडकून पडले होते. त्यानंतर ई-पास घेऊन आपापल्या गावी जाता येईल, असे जाहीर करण्यात आले. सुरवातीला हे काम गृहविभागांतर्गत करण्यात आले. मात्र, संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामीणची जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आली. याकामी एक पथक नेमण्यात आले होते.

या लॉकडाउनच्या काळात ई-पास मिळताच उपलब्ध विविध साधनाने संबंधितांनी घर जवळ करण्यास सुरवात केली. वैद्यकीय कारणांसाठी, नातेवाइकांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार कार्यक्रमास अशा विविध कारणांसाठी पासेससाठी अर्ज करण्यात येतो. ज्यांना खरेच गरज आहे. अशांना ई- पासेस उपलब्ध करून देण्यात आले. 

असा करा अर्ज 
www.kovid19.mhpolice.in या वेबसाईटवरून ई-पाससाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. संबंधित व्यक्तीला प्रवासाचे कारण, प्रवास कुटून कुठे करणार, प्रवासाचे कारण, प्रवासाची तारीख, सहप्रवासी संख्या, नावे, वाहनक्रमांक याबाबतची माहिती भरावी लागते. याशिवाय अर्जदाराचे छायाचित्र, कोविड-१९ ची लक्षणे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. अर्ज व्यवस्थित भरलेला असेल तर अवघ्या काही वेळातच ई-पास उपलब्ध करून दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com