file photo
file photo

पाण्यात वाढतेय फ्लोराईड 

औरंगाबाद - पाण्याचे प्रदूषण होऊन कवली (ता. सोयगाव) गावाच्या ग्रामस्थांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत आहे. यामुळे या गावात किडनी विकाराचे रुग्ण वाढत आहेत. 

डोंगरपट्ट्यात असलेले कवली हे छोटेसे गाव. २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या ७४० इतकी होती. आता त्यात वाढ होऊन ती ८०० ते ९०० इतकी झाली असावी. सोयगाव तालुक्यातील आमखेडा सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या गंभीर प्रश्‍नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. 

श्रीमती काळे यांनी सांगितले, या गावात गेल्या दहा वर्षांपासून लोकांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जातो. अनेक दिवसांपासून गावातील लोकांना किडनीचा त्रास होत आहे. गेल्या दहा वर्षांत या गावात पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण तपासण्यात आले नाही.

 दर दोन-तीन घरांनंतर एका घरात किडनी विकाराचा इथे रुग्ण आढळेल अशी परिस्थिती आहे. त्रास होत असल्याने गोळ्या-औषधी घेतल्याने त्याचा किडनीवर परिणाम होत असेल, अशी येथील लोकांची धारणा होती; मात्र काही रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पाण्यातील फ्लोराईडची माहिती मिळाली. 

ग्रामपंचायतीने पाठवला ठराव 

कवली ग्रामपंचायतीने ठराव घेऊन जिल्हा परिषदेकडे ठराव घेतला आहे. २५ फेब्रुवारीला कवली ग्रामसभेच्या अध्यक्ष तथा सरपंच जुबेदाबी तडवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली होती. या सभेत फ्लोराईडयुक्त पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी डिफ्लोराईज्ड युनिट बसविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

गावाला पुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढले असून, विशेषत: फ्लोराईडचे प्रमाण जास्त झाले आहे. त्यामुळे लोकांना अनेक व्याधी होत आहेत. त्यामुळे गावात डिफ्लोराईज्ड युनिट बसवून शुद्ध पाणीपुवठा करावा, अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषदेकडे देण्यात आला आहे. 

मी ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्ताव दिला आहे. त्या गावात डिफ्लोरायजेशन युनिट बसवून गावकऱ्यांना शुद्ध पाणीपुरवठा करावा व किडनी तसेच फ्लोराईडयुक्त पाण्याने होणाऱ्या इतर आजारांपासून सुटका करावी, अशी मागणी केली आहे. 

 पुष्पा काळे, जिल्हा परिषद सदस्य, आमखेडा सर्कल 

भूस्तरीय रचनेमुळे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण औरंगाबाद जिल्ह्यात नाही. पाण्याच्या शोधात जास्त खोलपर्यंत गेल्यानंतर तापमानही वाढते आणि जमिनीतील क्षार मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळतात. पाण्यातील क्षार वाढल्याने कदाचित सोयगाव तालुक्यात फ्लोराईड वाढले असेल. यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेने या भागाचे सर्वेक्षण करून किती क्षेत्रात फ्लोराईडचे प्रमाण वाढले आहे, याचा मॅप तयार करून तेवढ्या भागासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करणारी योजना राबवली पाहिजे. 

 डॉ. अशोक तेजनकर, भूगर्भशास्त्रज्ञ तथा माजी प्र-कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com