शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जनआक्रोश आंदोलन, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

NCP Janaakrosh Andolan
NCP Janaakrosh Andolan

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे औरंगाबादेत दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता.दोन) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा भगाओ देश बचाओ, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, किसानों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान में, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी पक्षाचे विजय साळवे म्हणाले, की गारठणाऱ्या थंडीत शेतकरी आंदोलन करित आहेत. हे आंदोलन ३७ दिवसांपासून सुरु आहे. कृषीविषयक काळे कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत. मोदी सरकारला देशातील शेतकऱ्यांशी काही देणे-घेण नाही. कृषी कायद्यांमुळे उद्योगपतींच्या घशात शेती टाकण्याचा उद्देश आहे. आगामी दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन तीव्र करेल अशी माहिती श्री. साळवे यांनी दिली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com