
औरंगाबाद ः निराधार, बेघर बालकांना सांभाळणाऱ्या बालगृहांवर बालकांना जगवण्यासाठी अक्षरशः हात पसरण्याची वेळ आली आहे. शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नाही. दीड वर्षापूर्वी रेशनचा धान्यपुरवठाही बंद केला. त्यामुळे बालगृहचालकांना दानशूरांना साकडे घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. लॉकडाउनच्या काळात रेशन देण्याचे मान्य करूनही अद्यापपर्यंत बालगृहांना धान्य देण्यात आले नाही. त्यामुळे बालगृहचालक हतबल झाले आहेत.
जिल्ह्यात १९ बालगृहे असून ५०० पेक्षा अधिक निराधार, अनाथ बालके आहेत. या संस्थांना अनुदान तर वेळेवर मिळतच नाही, शिवाय कर्मचाऱ्यांना वेतन आणि इमारत भाडेही मिळत नाही.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
प्रशासनाचा उदासीन कारभार
सामाजिक जाणिवेचा भाग म्हणून अनेकजण संस्था चालवतात. बहुतांश बालगृहांचे लाखो रुपयांचे अनुदान शासनाकडे थकीत आहे. लॉकडाउनच्या काळात शासनाने २१ मे रोजी परिपत्रक काढून बालगृहांना रेशनचे धान्य देण्याचे मान्य केले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील बालगृहांना तीन महिन्यांपासून धान्य देण्यात आले नाही. विशेष म्हणजे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांनी धान्य देण्याचे मान्य केले. बालगृहांची यादी मागवण्याचा फार्स केला. त्यानुसार बालविकास विभागाने पत्र आणि यादी सादर केली. संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला तरीही धान्याचा कणही मिळाला नाही.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
आता मदार दानशूरांवर
बालगृहातील बालकांना जगवण्याचे मोठे आव्हान बालगृहांसमोर आहे. लॉकडाउनपूर्वी दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या दानावर कसेबसे भागत होते. कोरोनाच्या लॉकडाउननंतर मात्र दानशूरांच्या मदतीचा ओघ कमी झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे बालगृहचालकांचे म्हणणे आहे.
बालगृहांच्या मुलांसाठी रेशनचे धान्य मिळावे म्हणून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना भेटूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे. स्वतः भेटून मागणी करू.
- हर्षा देशमुख, महिला बालविकास अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.