विहिरीत गाळ काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

ausa
ausa

औसा (जि. लातूर) : अरुंद विहिरीतील गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या आलमला (ता. औसा) येथील एकाच कुटुंबातील तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या विहिरीत एकूण सात जण उतरले होते परंतु ग्रामस्थांनी बाकीच्या चार जणांना बाहेर काढले.

अलमाला येथील गावात असलेल्या एका अरुंद विहिरीतील गाळ काढण्यासाठी सोमवारी सकाळी सात जण विहिरीत उतरले होते. खाली उतरल्यावर फारुख खुदबोद्दीन मुलानी (५५), सद्दाम फारुख मुलानी (२५) सय्यद दाऊद मुलानी (२८) यांचा गुदमरून मृत्य झाला. उर्वरित चार जणांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी हालर मशीन लावून या विहिरीत हवा सोडली. त्यामुळे उर्वरीताना ऑक्सिजन मिळाल्याने त्यांना जिवंत बाहेर काढणे शक्य झाले. यापैकी सुशांत महिशंकर बिराजदार (२२), योगेश उमाकांत हुरदळे (२२), साहिल कमाल मुलानी व मल्लिनाथ बसवेश्वर आंबूलगे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अजून हळद निघाली नव्हती
मृत्यू झालेल्या सद्दाम मुलानी यांचे गेल्या दहा पंधरा दिवसांपूर्वीच लग्न झालेले होते. अंगाची अजून हळद निघाली नसतांना त्यांच्यावर  मृत्यूने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com