शिवभोजनाचा घेतला ६४ हजार गरजूंनी लाभ

images (1).jpg
images (1).jpg

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सध्या २२ ठिकाणी शिवभोजन केंद्र कार्यान्वित आहेत. यात जिल्ह्यात दररोज अडीच हजार थाळींचा लाभ गरीब लोक घेत आहेत. रविवारपर्यंत (ता. १२) ६४ हजार १९४ शिवभोजन थाळीचा लाभ जिल्ह्यातील गरीब व गरजू व्यक्तींनी घेतला आहे. शिवभोजनासाठी लाभाधारकाकडून प्रती थाळीसाठी पाच रुपये आकारणी करण्यात येत आहे. पुढील तीन महिण्या‍पर्यत हा दर राहणार आहे.

पाचशे थाळीचे होते उदिष्ट्ये  
अन्न नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय ता. एक जानेवारी नुसार नांदेड जिल्ह्यास पाचशे थाळीचे उदिष्ट्ये देण्यात आले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरात एकूण चार शिवभोजन केंद्राची प्रत्येकी १२५ थाळीप्रमाणे निवड करण्यात आली. या शिवभोजन केंद्राव्दारे जिल्ह्यात गरीब व गरजू व्यक्तींना २६ जानेवारी पासून आतापर्यत स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन दिले जात आहे.

थाळीचा इष्टांक दुप्पटीने मंजूर 
अन्न‍ नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय ता. १८ फेब्रुवारीनुसार नांदेड जिल्ह्यास दिलेला शिवभोजन थाळीचा इष्टांक व गरज पाहून मुळ इष्टांकात नवीन वाढीव इष्टांक दुप्पटीने मंजूर करण्यात आले. त्यानुसार जिल्हयात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये नवीन तीन शिवभोजन केंद्रास प्रत्येकी शंभर थाळी प्रमाणे निवड करण्यात आली. तसेच यापुर्वी दिलेल्या पाच शिवभोजन केंद्रास प्रत्येकी पन्नास नवीन थाळी वाढ करून एकूण प्रत्येकी १७५ थाळीची संख्या निश्चीत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शिवभोजन थाळींचे वाटप चालू आहे.

सर्वच तालुकास्तरावर शिवभोजन सुरु
तसेच कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे स्थतलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्यावरील बेघर इत्यादी लोकांचे संपुर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने जेवण अभावी हाल अपेष्टा होऊ नये यासाठी अन्न‍ नागरी पुरवठा विभागाने शासन परिपत्रक २६ व २८ मार्च नुसार या योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यास मंजुरी दिली आहे. नांदेड जिल्हयास मुळ थाळीच्या इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली असून त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील १५ तालुक्यास प्रत्येकी शंभर थाळीप्रमाणे इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व तालुक्या‍स प्रत्येकी एक याप्रमाणे १५ शिवभोजन केंद्राची तालुकास्तरीय समितीने निवड केलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषीत झाले असल्याने त्यानुसार गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध व्हा‍वे या अनुषंगाने शिव भोजनालयास पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.

सामाजिक अंतर पाळून द्यावे भोजन
शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या कालावधीत गरीब व गरजू व्यतक्तींना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु राहतील. भोजनालय चालकांनी प्रत्येक ग्राहकाकडे कमीतकमी तीन फुट (एक मिटर) अंतर राहील याची दक्षता घ्यावी. शिवभोजनालय चालकांनी शिवभोजन उपलब्ध करुन देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबन उपलब्ध करुन द्यावे. शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा. शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत. भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जतुंक करुन घेणे. भोजनाची सर्व भांडी निर्जतुंक करुन घ्यावीत. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टीत स्वरुपात भोजन (packed food) उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com