औरंगाबादचे ७ तरुण अपघातात ठार

Accident
Accident

बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सर्व मृत औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.

नंदू किशनराव पवार (वय २८), सुरेश कान्हेरे (२७), अमोल निळे (२५), अमोल रमेश चवरे (२५), रवींद्र वाडेकर (२७, पाचही जण रा. शेरणापूर, ता. औरंगाबाद), गोपी कडुबा वरकड (३१) व महेश नंदी पाडळे (२७, दोघेही रा. दौलताबाद) अशी मृतांची नावे आहेत.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - औरंगाबाद जिल्ह्यातील सात मित्र शनिवारी (ता. एक) मोटारीने (एमएच- २०, डीव्ही- ७०९८) पर्यटनासाठी निघाले होते. कोल्हापूरमधील पर्यटनस्थळांना भेट देऊन ते बेळगावमार्गे गोव्याला निघाले होते. दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजनजवळ भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला. मोटार दुभाजकाला धडकून दुसऱ्या लेनमध्ये येऊन उलटली.

त्या वेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रकची (एमपी- ०९-७७३४) मोटारीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की मोटारीचा चक्‍काचूर झाला. मोटारीतील पाचजण जागीच ठार झाले. दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पोलिस आयुक्‍त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्‍त सीमा लाटकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतांच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली. नातेवाईक सायंकाळी बेळगावात आल्यानंतर मृतांची ओळख पटली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com