औरंगाबादेत सायंकाळी साडेपाचपर्यंत 58.64 टक्के मतदान 

छायाचित्र
छायाचित्र

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ढगाळ वातावरणामुळे कमी झालेली टक्केवारी दुपारनंतर बऱ्यापैकी वाढली. पाचव्या फेरीनंतर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात 58.64 टक्के मतदान झाले. 


जिल्ह्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या फेरीपर्यंत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात 67.12 टक्के मतदान झाले आहे. तर वैजापूर मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ 53.05 टक्केच मतदान झाले. जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघापैकी कन्नडमध्ये 62.89 टक्के, फुलंब्री 63.89 टक्के, पैठण 65.23 टक्के, गंगापुरात 54.26 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. 

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर टक्का वाढण्याची शक्‍यता होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे अजूनही मतदान झालेले नाही. साडेपाच वाजेपर्यंत औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात 54.01 टक्के, औरंगाबाद पश्‍चिमध्ये 53.4 टक्के तर औरंगाबाद पूर्वमध्ये 54.75 टक्के इतक्‍या मतदानाची नोंद करण्यात आली आहे. 
सकाळच्या ढगाळ वातावरणानंतर दुपारच्या सत्रात बऱ्याच ठिकाणी ऊन्ह पडल्याने मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.

दुपारी तीनपर्यंत आणखी गती मंदावली होती. अनेक बूथवर मशीनला तांत्रिक अडचणी आल्यामुळे मतदानासाठी नागरिकांना विलंब झाला. असे असले तरी बहुतांश मतदान केंद्रांवरील रांगा वाढतच होत्या. शेवटच्या सत्रात मात्र पुन्हा मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकूणच औरंगाबाद जिल्ह्यात साडेपाचपर्यंत पाचव्या फेरीत 58.64 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी केंद्रांवर रांगा कायम होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com