Sambhaji Nagar : पाणी योजनेचे ८११ कोटी द्या ; महापालिकेचा राज्य शासनाला पुन्हा प्रस्ताव

महापालिकेच्या वाट्याचे ८२२ कोटी रुपये राज्य शासनाने भरावेत, अशी मागणी पुन्हा एकदा प्रशासक जी. श्रीकांत यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. १९) पत्र पाठविण्यात आले आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar Sakal

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे ८११ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार हा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच महापालिकेच्या वाट्याचे ८२२ कोटी रुपये राज्य शासनाने भरावेत, अशी मागणी पुन्हा एकदा प्रशासक जी. श्रीकांत यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. १९) पत्र पाठविण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेतून शहरासाठी २७४० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत केंद्र शासनाचा ३०, राज्याचा ४५ तर महापालिकेचा ३० टक्के वाटा आहे. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी आतापर्यंत ९८१ कोटींचा निधी महापालिकेला दिला आहे. हे पैसे महापालिकेने योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. याच योजनेत जुन्या ७०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन बदलून त्याठिकाणी ९०० मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. त्यावर सुमारे २०० कोटींचा खर्च होणार आहे.

सध्या ९०० मिलिमीटर व्यासाच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे तर दुसऱ्या म्हणजेच २५०० मिलिमीटर व्यासाच्या योजनेचे काम ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे झालेल्या कामाचे कंत्राटदाराला बिल देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे ८११ कोटी निधीची मागणी केली आहे. मात्र, सध्या महापालिकेकडे कुठलाही निधी उपलब्ध नाही. म्‍हणून प्रशासक जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन ८११ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. योजनेचे काम थांबू नये, यासाठी हा निधी मिळावा, त्यासोबतच महापालिकेच्या हिश्शाचे ८२२ कोटी रुपये शासनाने भरावेत, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar Crime : आरोपीच्या कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला ; सराईत गुन्हेगार स्थानबद्ध, वृद्धांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने होता लुटत

आतापर्यंत ९८० कोटी खर्च

योजनेवर आतापर्यंत ९८० कोटी ८५ लाख रुपये खर्च झाला आहे. महापालिकेला ९९६ कोटी ६० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. यातील ९८१ कोटी ६५ लाख रुपये महापालिकेने जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. प्राप्त निधीत केंद्राने ४०७ कोटी ९९ लाख तर राज्य शासनाने ४९३ कोटी ७६ लाख रुपये दिले आहेत. त्यात व्याजाची रक्कम ९४.८५ कोटी एवढी आहे.

असा आहे बिलाचा तपशील

  • योजनेतील असाधारण वाढ व २७ वे देयक : १५० कोटी

  • ९०० मिलिमीटरच्या पुनरुज्जीवन योजनेचे बिल : १५० कोटी

  • मुख्य योजनेच्या यांत्रिकीकरणाची कामे : १९२.६० कोटी

  • २९ डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतचा अपेक्षित खर्च : ३२० कोटी

  • जीवन प्राधिकरणाकडे शिल्लक निधी : ८० लाख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com