ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा

रांजणगावात सत्ताधारी व विरोधक यांच्यात बेबनाव
Akrosh morcha
Akrosh morchaSakal

वाळूज महानगर - सत्ताधारी व विरोधक यांच्यात बेबनाव वाढल्याने तसेच वॉर्ड क्रमांक पाचमध्ये कचरा गाडी, पाणी पुरवठा तसेच पाणी पट्टीत केलेली वाढ याचे निमित्त करून सदस्य असलेल्या विरोधकांच्यावतीने वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) ग्रामपंचायतवर शुक्रवारी (ता. १०) रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) या ग्रामपंचायतला वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे मोठा कर मिळत असल्याने ही ग्रामपंचायत गंगापूर तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सर्वात सक्षम मानल्या जाते. एकेकाळी या ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र त्यानंतर आमदार प्रशांत बंब गटाने ही ग्रामपंचायत आपल्या कब्जात केली. शिवाय भाजप-सेनेचा काडीमोड झाल्याने त्यांच्यात बेबनाव वाढत गेला. आपापल्या राजकीय पक्षाला श्रेय देण्यासाठी व गावात तसेच ग्रामपंचायतमध्ये आपले प्राबल्य वाढवण्यासाठी जो तो काम करताना दिसून येतो.

त्यामुळेच येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी विशेषता शिवसेना-भाजप एकमेकांवर कुरघोडी करू पहात आहे. अशातच ग्रामपंचायतीने पाणीपट्टी आणि इतर कर दुप्पट केले. आणि शिवसेनेला आयते कोलीत मिळाले. त्याचाच फायदा घेत ही दरवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे वाढवलेले कर दोन दिवसात कमी करावेत, आणि शक्य झाल्यास एक वर्षाचा कर माफ करावा. या मागणीसाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप मनोहरे, सत्यशीला सुरुंग यांच्यावतीने हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com