Sambhaji Nagar News : शालेय स्तरावरच आता शेतीचे धडे ; कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे दिले जाणार ज्ञान

शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करण्यात आला. त्यानुसार आता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Newssakal

छत्रपती संभाजीनगर : शालेय शिक्षणात कृषी विषय समाविष्ट करण्यात आला. त्यानुसार आता तिसरीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे दिले जाणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा विषय अभ्यासक्रमात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शालेय स्तरावर (इयत्ता पहिली ते आठवी) कृषी वेगळा विषय नाही. पण, कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे ज्ञान शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. इयत्ता नववी ते बारावीसाठी ‘एनएसक्यूएफ’अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विषय घेतलेल्या शाळांमध्ये; तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषीसंदर्भातील आशयाचे अध्ययन-अध्यापन केले जात आहे. अनुषंगिक उपक्रमही राबविले जात आहेत.

Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar Crime : जनसंपर्क अधिकारी महिलेने केला ३४ लाखांचा अपहार ; ग्राहकांकडून कागदपत्रे मागवून घ्यायची कर्ज

इयत्ता अकरावी व बारावी स्तरावर विद्यार्थ्यांना द्विलक्षी अभ्यासक्रम कृषी गट आणि स्वतंत्र कृषी विज्ञान व तंत्रज्ञान वैकल्पिक विषय निवडण्याची ही संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातून कृषी विषयाचे ज्ञान मिळाल्यास त्यांच्या मनावर शेती विषयाचे महत्त्व वाढेल; तसेच त्यांची ग्रामीण समाजाशी नाळ जोडली जाईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

शालेय स्तरावर कृषी असा स्वतंत्र विषय नसला, तरी कार्यानुभव विषयाअंतर्गत कृषी घटकांचे ज्ञान पूर्वीपासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. परसातील बांधकाम, कुंडीतील लागवड, फळ प्रक्रिया, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, सुलभ शेती, खाद्यपदार्थ निर्मिती आदी क्षेत्रांतर्गत इयत्तानिहाय उपक्रम राबविले जात आहेत. शिवाय समाजोपयोगी उत्पादक कार्य, वृक्षारोपण व निगा काही शाळांमध्ये शेती व फळबागा आदी उपक्रम सुरू आहेत.

असा आहे अभ्यासक्रम

सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांमध्ये कार्यानुभव विषयाचे अध्ययन-अध्यापन केले जात आहे; तसेच इयत्ता नववी ते बारावीसाठी नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विद्यालय असलेल्या शाळांमध्ये; तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भातील आशयाचे अध्ययन-अध्यापन केले जात आहे.

इयत्ता अकरावी-बारावी स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये कृषीच्या अनुषंगाने स्वतंत्र वैकल्पिक विषय निवडण्याची संधी उपलब्ध आहे (जसे की कृषी विज्ञान-तंत्रज्ञान, पशुविज्ञान, दुग्ध व्यवसायशास्त्र, मत्स्यपालन तंत्रज्ञान, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय व उद्यानविद्याशास्त्र आदी). कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता कार्यानुभव विषयांतर्गत अभ्यासक्रमामध्ये कृषी घटकांचा समावेश करण्यात आला.

या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सर्वक्षेत्रीय अधिकारी व शाळांना सूचित करण्यात आलेले आहे.

- राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com