Aurangabad : बाबासाहेबांनी दिलेली घटना जगात सर्वश्रेष्ठ

फर्दापूर येथे सतरावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद उत्साहात
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
कृषीमंत्री अब्दुल सत्तार sakal

फर्दापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असून डॉ.आंबेडकरांनी भारत देशाला दिलेली राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ असून त्यांच्‍या घटनेमुळेच माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाचा माणूस मंत्री झाला, असे प्रतिपादन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

मंगळवारी फर्दापूर (ता.सोयगाव) येथे १७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची सांगता झाली. याप्रसंगी ते बोलत होते. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली संस्था येथे यात्री निवास, भिक्खू निवास, प्रसाधनगृह अशा पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत जवळपास १३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून यापुढे येथील सुविधांसाठी सर्वतोपरी मदत करू, असेही कृषिमंत्री सत्तार म्हणाले.

दरम्यान, परिषदेचे उद्घाटन अमेरिका येथील भिक्खू लामा रंगड्रोल यांच्या हस्ते झाले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी जपान येथील भिक्खू ताईजो इमानाका होते. व्यासपीठावर धम्मसेवक भन्तेजी चंद्रबोधी महाथेरो, सेवानिवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड, नगराध्यक्षा राजश्री निकम, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर काळे, देविदास लोखंडे, सिल्लोड जिल्हा बँकेचे अर्जुन गाढे, उस्मान पठाण, अक्षय मगर, रवींद्र बावसकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी संस्थेच्या धम्माचल स्मरणिका व बुद्ध संदेश मासिकेचे प्रकाशन मंत्री अब्दुल सत्तार व मान्यवरांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते शरद दामोदर, माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

शिवस्मारक, भीमपार्कला होणार सुरुवात

कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, फर्दापूर येथे जागतिक दर्जाचे शिवस्मारक तसेच भीमपार्कच्या कामाला आता सुरुवात होणार आहे. भीमपार्क उभारणी कामात भन्तेजी चंद्रबोधी महाथेरो यांनी सहभाग घ्यावा. फर्दापूर पाली सेंटरच्या बाबत मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन मुंबई येथे बैठक बोलावू असे मंत्री सत्तार म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या धम्म परिषदेत येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली होती. येथील रस्त्याचा तिढा सुटल्याने आता रस्त्याच्या कामासह विकास कामांना गती येईल असे ही कृषीमंत्री म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com