जायकवाडी धरणात रोज दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन

तापमानाचा पारा वाढत असतानाच पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात आजमितीला ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पावसाळ्या पर्यंत हा पाणी साठा पुरून उरणार अशी स्थिती आहे.
जायकवाडी धरणात रोज दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन

पैठण (जि.औरंगाबाद) : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून या उन्हाच्या तापमानाचा परिणाम येथील जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. सद्या नाथसागरात दररोज सरासरी दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असून एका महिन्यात जवळपास एकूण एक टीएमसी बाष्पीभवन होण्याचे प्रमाण आहे. बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात नैसर्गिक घट सहन करावी लागत आहे.

तापमानाचा पारा वाढत असतानाच पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरात आजमितीला ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पावसाळ्या पर्यंत हा पाणी साठा पुरून उरणार अशी स्थिती आहे. मागील वर्षी समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने तालुक्यातील सर्व बंधारे, विहिरी, ओढे, नाले व तलावात चांगला पाणीसाठा निर्माण झाला. परिणामी आता नाथसागरासह ऐन उन्हाळ्यातही बहुतांश तलावात अद्याप पाणीसाठा चांगला टिकून आहे. त्यामुळे जायकवाडी धरण व तलावांच्या लाभक्षेत्रातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटला आहे.

नाथसागरातून पंचक्रोशिसह औरंगाबाद, जालना आणि औद्योगिक क्षेत्राला दैनंदिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच अनेक पाणीपुरवठा योजनाही पाण्याचा लाभ घेत आहेत. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने समाधानकारक मुबलक पाणी साठ्यामुळे निम्मा एप्रिल महिना सुरू होऊनही नाथसागराची पाण्याची स्थिती चांगली आहे. अजून दीड महिना पावसाला अवकाश असला तरीही टंचाई भासणार नाही.

दरम्यान, उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला असून या उन्हाच्या तापमानाचा परिणाम येथील जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यावर होऊ लागला आहे. सद्या येथील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धरण निर्मितीच्या काळात बसविण्यात आलेल्या बाष्पीभवन मापन यंत्राद्वारे दररोज होत असलेल्या बाष्पीभवनाची नोंद केली जात आहे. सद्या नाथसागरात दररोज सरासरी दीड दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत असून एक महिन्यात तब्बल एक टीएमसी बाष्पीभवन होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे येथील बाष्पीभवनाच्या परिणामावर कसलाच उपाय व तोडगा नसल्याने प्रत्येक उन्हाळ्यात ही नैसर्गिक घट सहन करावी लागते.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात नाथसागरात ६० टक्के पाणी साठा होता. यावर्षीच्या एप्रिल मध्ये हा साठा ५७ टक्क्यांवर आहे. अडीच दिवसात उपलब्ध साठ्यातील एक टक्का पाण्याचा वापर होत असून शेती सिंचनासाठी ही कालव्याद्वारे पाणी देण्यात येत आहे. उपलब्ध साठ्याची स्थिती जून महिन्यात ३५ ते ३८ टक्क्यांपर्यंत पोहचेल. कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, दगडी धरण उपविभागीय अभियंता नामदेव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात येईल.

- संदीप राठोड, सहायक अभियंता, दगडी धरण, जलसंपदा विभाग,पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com