
औरंगाबाद : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मृत्यू प्रमाणपत्र, कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट नसलेल्यांना ही मदत कशी मिळेल, अशी विचारणा करताना रुग्णाचे नातेवाईक दिसत आहे, अशा नातेवाईकांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय कमिटीकडे पाठवावेत, असा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
राज्य शासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचले आहे. परंतु यात कागदपत्रासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना अनेक अडचणी येत असल्याचे सदस्यांनी सभेसमोर मांडले. यात कोरोनाने मृत्यू झाले, पण त्याच्या नातेवाइकांकडे कागदपत्रे नाहीत. त्याला काही पर्याय आहे का, संबंधित ग्रामपंचायत, मनपा प्रमाणपत्र देत नाही.
अशा परिस्थितीत संबंधित वारसांना ५० हजारांची मदत कशी भेटणार?, असा प्रश्न आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी उपस्थित केला. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्टही नाही, अशांच्या नातेवाइकांना मदत कशी भेटणार, असा सवाल समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केला. तर रुग्णाचा मृत्यू जर कोरोनामुळे झाला असेल, तर संबंधित ग्रामपंचायतीने मृत्युपत्र द्यावे, असा ठराव घेण्याची मागणीही गलांडे यांनी केली.
या रुग्णांवर अंत्यविधी शहरात झालेले आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत देणार नाही,असे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड म्हणाले. ग्रामपंचायतीने तसे प्रमाणपत्र दिले तर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढते. कोरोनाच्या काळातील मृत्यू लपवले की काय?, असा प्रश्न उपस्थित होईल. निमोनिया, श्वसनाच्या विकाराने मृत्यू झालेले, अशांचे मृत्यू गृहित धरले, तरच मदत मिळू शकते, असे सदस्य मधुकर वालतुरे म्हणाले, अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे हे प्रस्ताव पाठवावे, असा ठराव मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.