औरंगाबाद : ‘जायकवाडी’ ९० टक्के भरल्यानंतर करणार विसर्ग

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
Aurangabad Jayakwadi Dam
Aurangabad Jayakwadi Dam

औरंगाबाद - जायकवाडी धरण ९० टक्के भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी जलसंधारण विभागाला केली. आगामी दोन दिवसात धरणातील पाणी साठा ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याबाबत चव्हाण यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही सूचना केली. धरणातील आजचा पाणीसाठा १७४९ दलघमी असून, तो १९५३ दलघमी झाल्यानंतरच म्हणजेच ९० टक्के झाल्यानंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.

पुढील काही दिवसात धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेता, स्थिती पाहून विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांतील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चित करण्यासाठी ‘ब्ल्यूलाईन मार्किंग’ करण्याचे निर्देश देऊन यासंदर्भातील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मुख्य अभियंता विजय घोगरे, अधिक्षक अभियंता जयंत गवळी, सब्बीनवार, कार्यकारी अभियंता जी. एच. पाटोळे, पी. बी. जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, पोलिस निरिक्षक बालक कोळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com