औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रभाग आराखडा तयार करून पाठविण्यासाठी १७ मेची मुदत दिली होती. पण आठवडा उलटला तरी प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. प्रगणक गट व महापालिकेच्या सीमेनुसार लोकसंख्येची सांगड घालताना अडचणी येत आहेत. त्यावर मार्गदर्शन करावे, अशी गळ आता निवडणूक आयोगाला घालण्यात आली आहे.
आयोगाकडून मार्गदर्शन आल्यानंतर आराखडा तयार करून येत्या आठ दिवसात पाठविला जाणार आहे. महापालिकेची रखडलेली निवडणूक घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून १७ मेपर्यंत तो पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी महापालिकेला नकाशे उशिराने प्राप्त झाले.
आता नकाशे प्राप्त झाले पण काही प्रभागांमध्ये लोकसंख्येवरून घोळ होत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे लोकसंख्या आहे व महापालिकेकडे देखील लोकसंख्येचा आकडा आहे. पण त्यात तफावत आहे. प्रभागासाठी प्रगणक गटानुसार लोकसंख्या गृहीत धरली जाते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रगणक गट जोडून प्रभाग तयार करण्याचा प्रयत्न केला. पण आयोगाने निश्चित केलेली लोकसंख्या त्यात बसत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात मार्गदर्शन करावे अशी सूचना आयोगाला करण्यात आल्याचे उपायुक्त तथा निवडणूक विभागाचे प्रमुख संतोष टेंगळे यांनी सांगितले.
पडेगाव, जटवाडा परिसरात अडचण
निवडणूक आयोगाचे प्रमुख युपीएस मदान यांनी स्वत: बसून नकाशा तयार केला. भविष्यात कोणताही वाद निर्माण होता कामा नये यासंदर्भात आयोग काळजी घेत आहे. आयोगाच्या निर्देशानुसार शहरात १२६ वॉर्ड, ४२ प्रभाग तयार करायचे आहेत. पडेगाव, पैठणरोड, जटवाडा ही महापालिकेची हद्द आहे. त्या भागातील जुने प्रगणक गट नाहीत. त्यामुळे प्रभाग तयार करताना अडचणी येत आहेत. सातारा-देवळाई आणि पडेगाव भागातील लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.