औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नीकरण रद्द केल्याने विद्यार्थी कागदपत्रे घेऊन जाण्यासाठी आले होते. मात्र महाविद्यालयाने कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने ५० ते ७० विद्यार्थ्यांनी श्री साई इंजिनिअरिंगलाच टाळे ठोकले. शनिवारी (ता. २९) दिवसभर विद्यार्थी कॉलेज बाहेरच ठाण मांडून होते.
श्री साई इंजिनिअरींग कॉलेजने विद्यापीठाकडे कागदपत्रांची पूर्तता न केल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये संलग्नीकरण रद्द केले होते. उच्च न्यायालयानेही विद्यापीठाच्या बाजूनेच निकाल दिला. तसेच विद्यापीठाने या
कॉलेजमधील प्रवेश एव्हरेस्ट आणि आयसीममध्ये घ्यावे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे कागदपत्रांची मागणी करण्यासाठी विद्यार्थी शनिवारी कॉलेजमध्ये जमले. पुढील महिन्यांपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरु होत आहेत. त्यामुळे उपरोक्त दोन महाविद्यालयात प्रवेश घेऊन परीक्षा अर्ज भरावेत, असे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना कळविले आहे.
त्यामुळे आम्ही कागदपत्रे मागायला कॉलेजमध्ये गेलो असल्याचे विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कॉलेज प्रशासन सहकार्य करत नसल्याने शनिवारी विद्यार्थ्यांनी टाळे ठोकले. संस्थाचालकांशी बोलल्यानंतर त्यांनी मंगळवारपर्यंत मुदत मागितल्याचे विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही : जाधव
विद्यापीठाने संलग्नीकरण रद्द केले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करत आहोत. दोन दिवसात निकाल लागून जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही. ११ वर्षापासून कॉलेज सुरु असून हा बदनाम करण्याचा डाव आहे, असे संस्थाचालक जे. के. जाधव यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.