महाविकास आघाडी सरकार हे बहिरे आहे, भागवत कराड यांचे टीकास्त्र

महाविकास आघाडी सरकार हे बहिरे
Bhagwat Karad
Bhagwat Karadesakal

औरंगाबाद : २०१९ नंतर महाविकास आघाडी सरकार आले.त्यांनी दोन दिवसानंतर येणारं पाणी आठ दिवसांवर केले, अशी टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी राज्य सरकारवर केली. आज सोमवारी (ता.२३) औरंगाबाद (Aurangabad) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. कराड पुढे म्हणाले, माझ्या माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. टँकर कोणाचे ? याचे संशोधन महापालिका प्रशासनाने करावे. १६०० कोटी रुपयांची पाणी योजना केली. या महानगरपालिकेकडे वीजबील भरण्यासाठी पैसे नाहीत. मग पाण्यासाठी पैसे कुठून आणणार ?, असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला. (Bhagwat Karad Attacks On Mahavikas Aghadi Government For Water Shortage In Aurangabad)

Bhagwat Karad
....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जल वाहिनींचे भूमिपूजन केले. पण त्याचे काम पूर्ण झाले नाही. दीड वर्षामध्ये सात टक्केही काम पूर्ण झाले नाही. शिवसेना पाण्याच्या योजनेकडे दुर्लक्ष करित आहे. म्हणून जल आक्रोश मोर्चा आम्ही काढला. महाविकास आघाडी सरकार हे बहिरे झाले आहे. त्यांना ऐकू येत नाही, असा टोला कराड यांनी लगावला.

Bhagwat Karad
Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार

हे आपलं पहिल आंदोलन आहे. शासन व प्रशासन जागे झाले नाहीतर वारंवार आंदोलने करावे लागेल. या शहरावर तुमचे नेहमी प्रेम असते. ज्या वेळी कचऱ्याचा प्रश्न होता. आपल्या नेतृत्वाखाली पाण्याचा प्रश्न सुटावा, असा आशावाद कराड यांनी या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com