बारावी परीक्षेसाठी ‘रनर’ धावणार; परीक्षेसंदर्भात आज बैठक

जिल्ह्यात शिक्षण विभागाची यारी, ३३० वाहक
exam
examesakal

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. परीक्षा कामकाजासाठी केंद्र संचालक, सह केद्रसंचालक यासह ३३० वाहक ( रनर) असणार आहे.

राज्य मंडळासह विभागीय मंडळ आणि जिल्हा शिक्षण विभागात सध्या बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात नियोजन युद्धपातळीवर सुरु झाले आहे.जालना शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मुख्य परिरक्षक कार्यालय राहील.यंदा पहिल्यांदाच होम सेंटर परीक्षा होत असल्याने जिथे वीस विद्यार्थी संख्या तिथे प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा सह केंद्र देण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या निकषानुसार मूळ परीक्षा केंद्रावरून कामकाज चालणार आहे. परीक्षेच्या विशेष गोपनीय कामकाज पाहण्यासाठी मुख्य केंद्रानुसार ८० वाहक (रनर ) राहतील.

उपकेंद्रावर याच पद्धतीने प्रत्येकी एक वाहक राहणार असून कामकाज पाहणार आहे. उपकेंद्रावर असलेले वाहक हे इतर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना नेमणुका देण्यात आल्या आहेत. जालना परिरक्षक कार्यालयात गुरुवारी ( ता.२४ ) परीक्षा केंद्र संचालक, सह केंद्र संचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीत परीक्षा कामकाज विषयक राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदेश देण्यात आले आहे.

शुक्रवारी ( ता.२५ ) परिरक्षक कार्यालयात नेमणूक पत्र घेण्यासाठी वाहकांना विशेष सूचनाही देण्यात आल्या.

बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात आज नियोजन बैठक

शहर व तालुक्यातील केंद्र संचालक, परिरक्षक यांची बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्त्वाची नियोजन बैठक सोमवारी ( ता.२८ ) दुपारी एक वाजता बोलाविण्यात आली आहे.

जालना परिरक्षक कार्यालयांतर्गत सर्व केंद्रसंचालकाची बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात बैठक रेल्वेस्टेशन रोड परिसरातील जिल्हा परिषद मुलांची प्रशालेत आयोजित करण्यात आली आहे. बारावी परीक्षा साहित्य, पूर्वी उपकेंद्रना उत्तर पत्रिका, बारकोड, होलोक्राफ्ट इतर बोर्ड कडून प्राप्त साहित्य उपकेंद्रसंचालक यांच्याकडे देण्यात येणार आहे.सदर बैठकीत केंद्र संचालक , उपकेंद्रसंचालक, वाहक व परिरक्षक कार्यालयात कामकाज करणारे सर्व कर्मचारी यांच्या सभेत महत्त्वाची सभा घेतली जाणार आहे.सभेला येताना केंद्रसंचालक यांनी बारावी परीक्षेची पूर्व तयारी व सर्व साहित्य मिळालेले पत्र, केंद्र संचालक व उपकेंद्रसंचालक यांनी घेऊन येणे ,सर्व सुविधा परीक्षा घेण्यासाठी उपलब्ध असल्याचे शाळा मुख्याध्यापक यांचे पत्र आवश्यक आहे.अनुपस्थित राहिल्यास वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात येईल,असे परिरक्षक अशोक सोळंके यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com