बारावी परीक्षेसाठी होमसेंटर सज्ज; पूर्वतयारी जोरात

पूर्वतयारी जोरात, केंद्र संचालकांचे पोलिस ठाणे, महावितरण, बस आगारास पत्रे
 
Center ready for 12th exam
Center ready for 12th exam sakal

जालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना शुक्रवारी ( ता.४ ) सुरुवात होत आहे. पहिल्यांदाच होम सेंटर परीक्षा घेण्यात येणार आहे.परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्थेसह सुविधांची पूर्वतयारी करण्यात कनिष्ठ महाविद्यालये व्यस्त दिसून येत आहेत. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस ठाणे,वीजवितरण आणि बस आगारास केंद्रसंचालकांनी विशेष पत्र देवून सुविधांबाबत दक्षता राहण्याचे सांगितले आहे.

जिल्ह्यातील कला,वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शाखांच्या बारावी विद्यार्थ्याच्या बोर्ड लेखी परीक्षा सुरु होत आहे. जिल्ह्यातील २८० कनिष्ठ महाविद्यालये आहेत.बारावी बोर्ड परीक्षेसाठी मूळ केंद्र ७९ आहेत. राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच परीक्षा होम सेंटरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार किमान वीस विद्यार्थी संख्या असेल तर होमसेंटर नाहीतर कमी संख्या असेल तर मुख्य केंद्र देण्यात आले आहे.

जालना शहरासह जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधेसह बैठक व्यवस्था करण्यात केंद्र संचालक व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य केंद्रासह उपकेंद्रावर परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी पोलिस ठाण्याला विशेष पत्र देण्यात यावे अशा सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याची दक्षता केंद्र संचालकांना घ्यावी लागणार आहे. यासाठी वीजवितरण कंपनीला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत केंद्र संचालकांनी पत्रासह कळविले आहे.

जिल्ह्यातील ज्या परीक्षा केंद्रावर बाहेर गावातून विद्यार्थी एसटी बसने येत असतील तर अशा विद्यार्थ्यांना विशेष बससेवा पुरविण्याबाबत केंद्र संचालकांनी आगार व्यवस्थापकांना संपर्क साधावा,अशा सूचनाही राज्य मंडळाने दिल्या आहेत.बारावी बोर्ड परीक्षा दोन दिवसावर आली असल्याने परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील सरस्वती भुवन प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर वर्गनिहाय बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे केंद्र संचालक प्रा.रमाकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

रेवगाव (ता.जालना ) येथील किंग शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय उपकेंद्रावर मुख्य केंद्राचे संचालक प्रा.राजेंद्र आंधळे यांनी बुधवारी ( ता.दोन ) भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली. सह केंद्र संचालक अभय गायकवाड यांना परीक्षा कामकाज विषयक औरंगाबाद विभागीय मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्याबाबत प्रा.आंधळे यांनी सूचना दिल्या. बैठकीस पूनम खोडवाल, दिनेश शेळके, पल्लवी उढाण, नारायण गोल्डे यांची उपस्थिती होती.

अनेक कनिष्ठ महाविद्यालयाचा पहिलाच अनुभव

राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच होम सेंटरनुसार परीक्षेचा निर्णय घेतला आहे. यामुळे सत्तर टक्के कनिष्ठ महाविद्यालये परीक्षेचा पहिलाच अनुभव घेतील.यातही अनुदानित पेक्षा अंशतः आणि स्वयंअर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या जास्त आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयात भौतिक सुविधेसह इतर सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. होम सेंटर जरी परीक्षा असल्या तरी याचा नियोजनाचा भार मात्र मुख्य केंद्रावर देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com