

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठा आहे, असा दावा प्रशासन करीत आहेत. प्रत्यक्षात पंपांवर तासन् तास रांगेत राहूनही डिझेल मिळत नाही. त्यामुळे खरेच टंचाई आहे की ती निर्माण केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा सर्वाधिक फटका मालवाहतूक व्यवसायाला बसला. डिझेल मिळत नसल्याने सध्या जिल्ह्यात जवळपास एक हजार ट्रक, कंटेनर आणि मालवाहतूक करणारी वाहने जागेवरच उभी आहेत. त्यामुळे दिवसाकाठी २५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होत असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दिली.