

“Flame of Identity Lit by Swamiji: Swami Ramanand Teerth Statue Unveiled by CM”
Sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. मराठवाडा अस्मितेची ज्योत पेटवली. महिलांसह अनेकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे’’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.