का वाढत आहेत औरंगाबादेत रुग्ण ? 

का वाढत आहेत औरंगाबादेत रुग्ण ? 


औरंगाबादः शहरात पहिला रुग्ण १५ मार्चला आढळला. त्यानंतर २६ एप्रिलपर्यंत ५३ रुग्ण होते. दरदिवशी १.२६ रुग्ण सापडत होते; पण २७ एप्रिल ते ११ मेपर्यंत ५६६ रुग्ण आढळले! अर्थात या काळात दरदिवशी ३७ एवढे रुग्ण आढळले आहेत. देशाचा डबलिंग रेट १०.२ असताना शहराचा हा रेट पाचपर्यंत पोचला आहे. रुग्णसंख्याही वाढतीच आहे. याला महत्त्वाच्या कारणांसह बेजबाबदार नागरिक, प्रशासनाच्या मर्यादा, कमतरता, चुका, वैद्यकीय अपुरी क्षमता आदी महत्त्वाची कारणेही आहेत. 

परिसर दाट लोकवस्तीचा 

पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत ५७ दिवस झाले आहेत. औरंगाबादेत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७९.६७ टक्के रुग्ण मुकुंदवाडी, बेगमपुरा, जिन्सी, सिटी चौक, पुंडलिकनगर, क्रांती चौक या सहा पोलिस ठाणे हद्दीतील आहेत. या हद्दीतील बाधित रुग्णांचा परिसर दाट लोकसंख्येचा आहे. तेथील बहुसंख्य नागरिक हलाखीच्या स्थितीतील, गरीब, निम्न मध्यमवर्गीय आहेत. सर्वात कमी रुग्ण सिडको, एमआयडीसी सिडको, वेदांतनगर, जवाहरनगर, उस्मानपुरा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भागातील आहेत. याचाच अर्थ दाट लोकवस्तीचा भाग कोरोनासाठी पोषक ठरत आहे.

हेही वाचा- त्यांच्यासाठी सोडल्या बाॅर्डरपर्यंत पाच एसटी

या भागांत जास्त रुग्ण; पण का... (कंसात टक्केवारी) 

  • या भागांत मजूर, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. परिणामी या भागातील लोकांना काही ना काही कारणासाठी बाहेर पडावेच लागते. 
  • विशेषतः या भागात लोक भाड्याने राहण्याचे प्रमाणही मोठे आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह आणि स्नानगृहाचाही वापर संयुक्तपणे केला जातो. 
  • दाट घरे, किरकोळ वस्तूंसाठी बाहेर पडणे हेही कारण आहे. 
  • पुंडलिकनगर येथील भाजी विक्रेता असो की फर्निचरचे काम करणारा समतानगरचा तरुण, त्यातून मोठी लागण झाली. 
  •  अर्थात हायरिस्क कॉन्टॅक्टमधील लोकांचा संपर्कही धोक्याचा ठरत आहे. 
  •  फिजिकल डिस्टन्स इतरांशी पाळले जात आहे; पण कुटुंबीयांसोबत नाही. त्याचा मोठा फटका बसत आहे. 
  • अल्प उत्पन्न, निम्न उत्पन्न गटातील लोक कोरोनोची शिकार होत आहेत. 
  •  शिक्षणाचा अभाव असणारा समूह या महामारीच्या कचाट्यात सापडत आहे. 
  • दाट लोकसंख्या, जास्त घनतेचा परिसर व अज्ञान हीदेखील कारणे आहेत. 
  • हातावर पोट असणारे लोक या भागात आहेत. त्यांना बाहेर पडावेच लागते. 
  • घराला घर जोडून असलेल्या भागात संशयित रुग्ण फिरू शकतात. त्यातून संसर्गही. 
  • प्रशासनाच्या सुरवातीच्या काळातील चुका. मृतदेह सोपविताना न घेतलेली खबरदारी. 
  •  मर्यादित साधने, अपुरे मनुष्यबळ, गतिमान आरोग्य सुविधांचा अभाव, बेजबाबदार नागरिक. 


कोरोना विदेशातून आलेल्या लोकांनी भारतात आणला. पण त्याची किंमत आता गरिबांना मोजावी लागत आहे. जगाच्या तुलनेत कोरोनाचे लोण औरंगाबादमध्ये उशिरा सुरू झाले. त्यातच येथे टेस्टिंगही उशिराच सुरू झाले. दिवस पुढे जातील तसे आकडेही सरकतील. ते धक्कादायक नाहीत. टेस्टिंग झाल्यानंतर खरी परीक्षा आहे. आताचे आकडे भीतीदायक वाटत नाहीत. अजून वाढेल तेव्हा खरी स्थिती पाहणे योग्य ठरेल. गरीब, दाट लोकवस्तीत कोरोना पसरत आहे. 
- देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए. 

ठाण्यांच्या हद्दीनिहाय लोकवस्तीतील रुग्ण 

  • मुकुंदवाडी (१३५) 
  • बेगमपुरा (१२५) 
  • सिटी चौक (९६) 
  • सातारा (९१) 
  • जिन्सी (६२) 
  • पुंडलिकनगर (३६) 
  • क्रांती चौक (३०) 
  • छावणी (२२) 
  • एमआयडीसी सिडको (४) 
  • वेदांतनगर (७) 
  • औरंगाबाद ग्रामीण (१२) 
  • सिडको (६) 
  • एमआयडीसी वाळूज (२) 
  • जवाहरनगर (२) 
  • उस्मानपुरा (३) 
  • एकूण ६२७ रुग्ण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com