राज्यातील नोकरभरती एकाच यंत्रणेद्वारे करण्याची मागणी आता धरू लागली जोर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - राज्यातील वर्ग-एक ते चार श्रेणीतील सर्व रिक्त जागा एकाच यंत्रणेद्वारे एमपीएससीच्या माध्यमातूनच भराव्यात, या मागणीसाठी बुधवारी (ता.२२) स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व शिक्षक यांनी #MPSCForAllExams मोहीम राबविली. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्युब, टेलिग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जनजागृती केली. या मोहिमेला विद्यार्थी व शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

‘पहिले पाढे पंचावन्न’ होऊ नये
महसूल विभाग, पोलिस, जिल्हा परिषद, कृषी विभाग, समाजकल्याणसह विविध विभागांत स्वतंत्र नोकरभरतीची जाहिरात दिली जाते. यासाठी आधी महापरीक्षा पोर्टलद्वारे ही भरती होत होती. त्यात अनेक गैरप्रकार झाल्यानंतर हे पोर्टल बंद करण्यात आले. त्याजागी पुन्हा खासगी कंपनीची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ‘पहिले पाढे पंचावन्न’ होण्याचीच शक्यता आहे. शिवाय वेगवेगळ्या जाहिराती आल्यानंतर त्यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे नोकरभरतीची एकच यंत्रणा असावी, एमपीएससीमार्फतच सर्व जागांची भरती करावी, अशी विद्यार्थी, शिक्षकांची मागणी आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एमपीएससीही अनुकूल
मध्यंतरी शासनाने एमपीएससीला अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला नुकताच आयोगानेही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध केल्यास आम्ही तयार असल्याचे एमपीएससीने शासनाला कळविले आहे. एमपीएससीद्वारे होणाऱ्या निवडीवर तुलनेने विद्यार्थ्यांचा अधिक विश्वास आहे. खासगी कंपनीपेक्षा आयोग कधीही बरा, असे त्यांचे म्हणणे आहे. आता याचा गांभीर्याने विचार करावा, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या मोहिमेद्वारे केली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पत्र 
याच मागणीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविलेले आहे. ऑनलाइन नोकरभरतीसाठी खासगी कंपनीकडून टेंडर मागविण्याची प्रक्रिया तातडीने रद्द करावी, एमपीएससीला अधिकार देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी यात केली आहे. 

स्पर्धा परीक्षेशी निगडित असणाऱ्या सर्वांनी याबाबत जनजागृती करावी. एकाच यंत्रणेद्वारे म्हणजे एमपीएससीमार्फत वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंतच्या सर्व परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा मनस्ताप कमी होईल, पारदर्शकता वाढेल व सरकारला चांगल्या गुणवत्तेचे अधिकारी, कर्मचारी मिळतील. 
सुशील रगडे, सदस्य, महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com