

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: ‘तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी कोणालाही सांगू नका’, हा इशारा गेल्या काही वर्षांत प्रत्येक बँक ग्राहकासाठी चांगलाच परिचयाचा झाला आहे. मात्र, आता केवळ ओटीपीवर आधारित सुरक्षा पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डिजिटल व्यवहार व्यवस्थेत मोठे बदल केले जात आहेत. आता ग्राहकाची ओळख दोन किंवा अधिक स्तरांवर तपासली जाणार आहे. त्यात मोबाइलची ओळख, ग्राहकाचा चेहरा, बोटांचे ठसे, व्यवहाराची सवय, वापरलेले उपकरण, व्यवहाराचे ठिकाण यांचा समावेश असेल. यामुळे भविष्यात केवळ ओटीपी मिळाला म्हणून व्यवहार लगेच पूर्ण होणार नाही.