Ravikant Tupkar Slams Government Over Farmer Distress
esakal
लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा नुकताच वीज पडून मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नवीन बैल खरेदी करण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी स्वतःच्या पत्नीला अवताला जुंपल्याची धक्कादायक (Maharashtra farmer crisis 2026) घटना समोर आली आहे. या घटनेवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.