औरंगाबाद: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामूळे आतोनात हानी झाली आहे. याच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूची मदत पाठविण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरवासीयांना मदतीचे आवाहन केले आहे. यात आतापर्यंत २० क्विंटल धान्य जमा झाले आहे. यासह इतर साहित्यही जमा करण्यात येत आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश वेताळ आणि मनोज गायके व सुरेश वाकडे पाटील यांनी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षीही पुरामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे ट्रकभरून जीवनावश्यक वस्तू पाठविल्या होत्या. त्यानंतर आता यंदा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने मोठे थैमान घातले. यात मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली. यातून नागरिक सावरत आहे. त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मदत दिली जाणार आहे. जमा झालेली मदत ही २९ जुलै दुपारी रोजी रवाना करण्यात येणार आहे.
नागरिकांनी गहु, साखर, तांदुळ, डाळ, तेल, मीठ, साडी,ब्लँकेट, बिस्किट, चिवडा या स्वरूपातील मदत द्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यासह अधिका माहितीसाठी संपर्क ९८२३११३३२२, ९६२३५५११२२, ९९७५३१८१८४, ९४२२२९४००४ ९०४९११९००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
या ठिकाणी पाठवा साहित्य-
संकलन केंद्र :
१) बुलंद छावा कार्यालय, टीव्ही सेंटर संभाजीनगर
२) एन ११ मयुर नगर एलोरा अर्बन क्रेडीट को. ऑप सोसायटी औरंगाबाद.
३) पटेल कॉम्प्लेक्स, पहिला मजला,बँक ऑफ बडोदाच्या शेजारी, सूतगिरणी रोड, गारखेडा, औरंगाबाद
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.