Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील धरणे गाठताहेत तळ; सरासरी २८ टक्के जलसाठा, आठही जिल्ह्यात हजारो गावांना टँकरचा आधार

Marathwada Faces Growing Water Crisis: मराठवाड्यातील धरणांमध्ये सरासरी २८ टक्केच जलसाठा शिल्लक असून पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जून निम्मा झाला तरी मराठवाड्यात उन्हाच्या झळा आणि असह्य उकाडा कायम आहे. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. दुसरीकडे धरणांतील जलसाठा झपाट्याने घटत आहे. मराठवाड्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांत सध्या सरासरी २८ जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस होईपर्यंत हा जलसाठा जपून वापरावा लागणार आहे. गतवर्षी मराठवाड्यात दमदार पाऊस झाला होता. पावसाळा लांबला होता. त्यामुळे सर्वच धरणे, प्रकल्प तुडुंब भरले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com