औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जनजीवन विस्कळीत झाले. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे. प्रत्येकाला स्वतःची, कुटुंबाची काळजी लागली आहे. देशातील आतापर्यंत २२ राज्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले; पण सहा अशी राज्य आहेत की जिथे आतापर्यंत एकही एकाही व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यामुळे ही राज्य सध्या देशातील सर्वाधिक सुरक्षित समजली जात आहेत.
कोरोना विषाणूपासून होणाऱ्या कोवीड-१९ या आजाराने देशातील २२ राज्यांत शिरकाव केला; पण सध्या झारखंड, आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नॅगालॅण्ड आणि त्रिपुरा ही सहा राज्य कोरोनापासून कोसो दूर आहेत. नाही म्हणायला या ठिकाणी काही संशयित आढळले होते; मात्र त्यांच्या लाळेची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी या सहा राज्यांनीही संपूर्ण खबरदारी घेतली असून, सीमा लॉक केल्या आहेत. संपूर्ण आरोग्य तपासणी करूनच या राज्यात बाहेर राज्यातून आलेल्यांना प्रवेश दिला जात आहे. उपाययोजना म्हणून इथेही लॉकडाऊन आहे. नागरिक घरांमध्ये आहेत. बाजारपेठेतील उलाढाल बंद झाली आहे.
आसाम, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम, नॅगालॅण्ड आणि त्रिपुरा या राज्यांत उन्हाळ्यामुळे पर्यटकांची संख्या वाढते. बाहेर देशातून, राज्यातून येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील अनेकांना रोजगार मिळाला आहे; पण गेल्या आठवडाभरापासून पर्यटक येणे बंद झाले आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या देशात ७५३ जण कोवीड-१९ चे रुग्ण आहेत. त्यापैकी ६७ जण बरे झाले तर १८ जणांचा मृत्यू झाला. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण केरळ आणि त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आहेत. कालच्या तुलनेत देशभरात आज १८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रातील १३५ रुग्णांपैकी १५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (ता. २७ मार्च) राज्यात नवे राज्य रुग्ण आढळले तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या -
Coronavirus : प्रादुर्भाव वाढतोय, पण आली एक दिलासादायक बातमी, वाचा...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.