

Market Prices Shock Maharashtra Onion farmer
Esakal
गजानन आवारे, पैठण ः ‘शेतकऱ्याने रात्रंदिवस राबायचं, रक्ताचं पाणी करून पिकावर खर्च करायचा आणि शेवटी बाजारात विकताना स्वतःच्याच खिशातून पैसे का भरायचे, आमच्या कष्टाला काही किंमत नाही का, असा संतप्त सवाल पैठण तालुक्यातील वरूडी येथील शेतकरी प्रकाश काकासाहेब गलधर यांनी अख्ख्या यंत्रणेला विचारला. चार एकर शेतात घेतलेल्या उन्हाळी कांद्याला बाजारात इतका कमी भाव मिळाला, की १२ क्विंटल कांदा विकूनही त्यांच्या हातात ‘उणा रुपया’ राहिला. या प्रकारामुळे हतबल झालेल्या गलधर यांनी उरलेला तब्बल ३०० क्विंटल कांदा असलेल्या दोन एकर शेतात नागरंटी करून खत म्हणून टाकून दिला!