

Chhatrapari Sambhajinagar
esakal
पाचोड: उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाचोडसह पैठण तालुक्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. बाष्पीभवनामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने, बागायतदार आता उसाचे पाचट, गव्हाचे भूस, प्लॅस्टिक आणि चक्क जुन्या साड्यांचा वापर करून आच्छादन (मल्चिंग) करत आहेत. कष्टाने वाढवलेल्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची ही अहोरात्र धडपड सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.