
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, हा विचार मांडला. तोच विचार महानुभाव पंथाचा गाभा असल्याचे महानुभाव पंथाचे परम महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले. महानुभाव पंथाचे परम महंत बाभूळगावकर बाबा यांना राष्ट्र सेवा दलाचा साने गुरुजी समता पुरस्कार प्रदान करण्यात आला, याला उत्तर देताना ते बोलत होते.