औरंगाबाद : शैक्षणिक वर्ष लांबल्याने पोषण आहाराची अडचण

poshan_20.jpg
poshan_20.jpg
Updated on

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रासह शालेय पोषण आहार अर्थात माध्यान्ह भोजनावरही होणार आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शालेय पोषण आहारावर अवलंबून असतात; मात्र शाळा सुरू न झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचे मत शिक्षकांसह पालकांनीही व्यक्त केले आहे. 

लॉकडाउनमुळे शिक्षण विभागाने उर्वरित पोषण आहार विद्यार्थी पालकांपर्यंत पोचविण्याची सूचना केली होती. त्यानुसार काही भागांत पोषण आहारातील उर्वरित धान्य, तांदूळ वाटप करण्यात आले. तर काही ठिकाणी अद्यापही सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या या पोषण आहाराच्या तांदळावर विद्यार्थ्यांसह पालकही अवलंबून होते. 

नवीन वर्षाचे शैक्षणिक सत्र कधी सुरू होईल याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, असे शासनाने शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काही संघटना आणि मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुखांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पोषण आहारासंबंधी योग्य तो निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील ६६ हजार ७५० शासकीय शाळांमधून ५० लाख ५४ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील ४० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागात आहेत. औरंगाबाद जिल्‍ह्यात २ हजार दोनशे शाळांमधील सुमारे दोन लाख पंचवीस हजार विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. सध्या पालकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे १५ जूनपासून नियमित विद्यार्थ्यांना कोरडा पोषण आहार देण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
विद्यार्थी शाळेत कधी बोलवायचे याबाबत अद्याप शासनाने निर्णय जाहीर केलेला नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांची पोषण आहाराची अडचण होऊ शकते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात येईल. त्यांना टप्प्याटप्प्याने कोरडे धान्य, तांदूळ देण्याचा पर्याय करता येऊ शकतो. 
- राजेश हिवाळे, शिक्षक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com