
औरंगाबाद : क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार आहे. या कार्यक्रमास शिवरायांच्या वंशजांना बोलावून त्यांच्या हस्तेच अनावरण करावे, अशी मागणी शुक्रवारी (ता. २८) एमआयएम विद्यार्थी आघाडीतर्फे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. खरात म्हणाले, की बहुजन समाजाच्या न्याय हक्कांसाठी क्रांती चौकातून अनेक पक्ष, सामाजिक संघटनांचे मोर्चे निघाले. त्याच चौकात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना होणार आहे. आधीच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणीही सर्व घटकांनी केली होती.
ते स्मारक आता पूर्ण होत असून उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना निमंत्रित करावे, अशी आमची मागणी आहे. तसेच टीपू सुलतान हे इंग्रजांविरोधात लढले आणि शहीद झाले. त्यामुळे ते स्वातंत्र्यसेनानी आहेत. तसेच यासंबंधी होणारा वाद निरर्थक आहे. तो वाद मिटला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले.
शाळा, विद्यापीठे सुरू करा
कोरोनामुळे दोन वर्षापासून शाळा, महाविद्यालये कधी चालू कधी बंद होत आहेत. त्यामुळे दर्जाची घसरण होत आहे. तो सुधारण्यासाठी ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरु झाली पाहिजेत. विद्यार्थी जेव्हा जॉबसाठी जातात, तेव्हा त्यांना कंपन्यामध्ये पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. हे टाळायचे असेल तर, शिक्षणातील अडथळे दूर केले पाहिजेत, असे डॉ. खरात म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.