छत्रपती संभाजीनगर - ऐन महापालिका निवडणुकीत शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. वारंवार येणारे तांत्रिक बिघाड तसेच रोहित्र आणि पाणी उपसा पंप बंद असल्याने शहरात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे..असे असताना शहरात रोज तब्बल १४७ एमएलडी पाणी मिळत असून, केवळ १७ एमएलडी पाणी कमी येत आहे. त्यामुळे नियोजनाअभावी पाणीटंचाई जाणवत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे प्रचार भरात येत असताना दुसरीकडे दहा दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. आठ ते दहा दिवसांत दोन वेळा जलवाहिनी फुटली तर वीज खंडित झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यात रोहित्र आणि पंप खराब झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगितले जात आहे..शहराला १०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून ९८ ते १०५ एमएलडी पाणी मिळते तर ५६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून ३५ एमएलडी व २६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या योजनेतून २२ एमएलडी पाणी मिळते. या तिन्ही योजनेतून रोज १६२ एमएलडी पाणी मिळत आहे..परंतु, पंप बंद असल्याने तीनही योजनेतून सध्या शहरात १४७ एमएलडी पाणी येत आहे. १४७ एमएलडी पाण्याचे योग्य रितीने वितरण करण्याचे नियोजन केले जात नसल्यामुळेच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.