'औरंगाबाद'चं 'संभाजीनगर' होणार? राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं!

राजेश टोपे यांनी या नामांतराबद्दलची ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
rajesh tope
rajesh tope file photo

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सध्या रंगत आहे. याच वादादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर होणार का याबाबत राजेश टोपे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. राजेश टोपे म्हणाले की, औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही आणि आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (Shivsena) लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना आनंद वाटतो.

टोपे पुढे म्हणाले की, गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर म्हणतात, पण मला वाटत नाही की हा विषय अजेंड्यावरचा आहे. आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा, रस्त्याचे, विजेचे आणि अन्य प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे आपण लक्ष देऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com