माझी चिमुकली गेली; इतरांचे जीव तरी वाचवा

aayushi
aayushi

औरंगाबाद : ''माझी चिमुकली गेली; पण इतरांसोबत अशी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी काही तरी उपाय करा," असे आर्जव डेंगीमुळे मृत्युमुखी पडलेल्या आयुषीच्या कुटुंबीयांनी शनिवारी (ता. 28) महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांना केले. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.
 
शहरात डेंगीने थैमान घातले असून, गेल्या पाच दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. 27) रंगारगल्ली येथील आयुषी रेणुकादास बोंबले या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात पहाटेपासून डास प्रतिबंधात्मक उपाय-योजना सुरू केल्या. आरोग्य विभागाच्या पथकासोबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुषीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आयुषीच्या वडिलांनी "माझी चिमुकली तर गेली मात्र, इतरांसोबत अशी घटना घडू नये यासाठी किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करा' अशी मागणी केली. महापौरांनी आश्‍वासन देत स्वतःची सुटका करून घेतली.

आयुक्त परतले 

शहरात डेंगीमुळे पाच जणांचे जीव गेलेले असताना आयुक्त डॉ. निपुण विनायक मात्र स्मार्ट सिटीमध्ये केलेल्या कामासंदर्भातील मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी बेंगळरूला गेले होते. ते शनिवारी शहरात परतले; मात्र शनिवारीदेखील त्यांनी आढावा घेतला नाही. 

संवेदनशील भागात द्या, तीन दिवसांआड पाणी 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठ्यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले असून, त्यात डेंगीचा ज्या भागात जास्त उद्रेक झाला आहे, अशा अतिसंवेदनशील भागात किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करा, आशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com