नांदेड : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना (ता. १९) जूलै घडली होती.
भोकर तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी बालाजी गायकवाड (वय ५०) यांच्या शेतावर मागील तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातून ते कर्जबाजारी झाले. प्रपंच कसा चालवायचा व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत सापडलेल्या बालाजी गायकवाड यांनी (ता. १९) जूलैला विष पीले.
त्यांना नांदेडच्या विष्णुपूरी भागात असलेल्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती रुग्णालयीन चौकीचे पोलिस कांबळे यांनी दिल्यावर, भोकर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २४) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदारजाधव हे करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.