Love Jihad : महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करा

मनोज खाड्ये यांची मागणी ; बीड शहरात हिंदू राष्ट्र सभा
Beed
Beed Sakal

बीड : रुपाली चंदनशिवे हिची पती इक्बाल मोहम्मद शेख याने ती इस्लामी परंपरांचे पालन करत नाही म्हणून गळा चिरून हत्या केली, तर आफताबने ‘लिव्ह इन’मध्ये राहाणाऱ्या श्रद्धा वालकर हिने लग्नासाठी हट्ट केला म्हणून निर्घृण हत्या केली. या प्रकरणांची गंभीरता पाहता महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तत्काळ करण्यात यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये यांनी केले.

श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे रविवारी (ता. २०) हिंदू राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. यावेळी व्याख्यानकार व प्रवचनकार योगेश महाराज साळेगांवकर, सनातन संस्थेच्या स्वाती खाड्ये उपस्थित होत्या. मनोज खाड्ये म्हणाले, काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणांमुळे हिंदू, ख्रिस्ती, बौद्धाची संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अधिकार दिले आहेत. येथील कंकालेश्वर मंदिराची भूमी नियमबाह्य विक्री झाली. येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणाहून सोडलेले सांडपाणी मंदिराच्या दिशेने आहे, तसेच त्या ठिकाणी संरक्षक भिंत नाही.

योगेश स्वाती खाड्ये म्हणाल्या, पुढारलेपणाच्या नावाखाली आपण महान हिंदू धर्मापासून दूर चाललो आहोत. विदेशामध्ये हिंदू धर्म, योग, आयुर्वेद यांविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होत आहे. पुढे विदेशातील लोकांकडून हिंदू धर्माचे धडे गिरविण्याची वेळ येईल. प्रारंभी विवेक झरकर यांच्या शंखनादानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अनिल महाराज निर्मळ, कैलास महाराज रामदासी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी मांडला. विपुल भोपळे आणि नीलेश सांगोलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

धर्मशिक्षण नसल्याने आघातांचे प्रमाण वाढले

महाराज साळेगावकर म्हणाले, ‘‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नसल्याने हिंदूंवरील आघातांचे प्रमाण वाढले आहे. इंग्रजांनी भारतातील गुरूकुल शिक्षण पद्धती बंद पाडून हिंदूंची कुटुंबव्यवस्था मोडकळीस आणली. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात येत आहे. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रात कठोर कायदा करण्यात यावा. सावरकरांची देशभक्ती कळण्यासाठी रक्तातच देशभक्ती असणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com